विक्रम गोखलेंनी व्यक्त केला संताप, म्हणतात… मोबाइलवर कायद्याने बंदी आणली पाहिजे!

मुंबई तक

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गुरुवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली अनेक राजकीय मतं रोखठोकपणे मांडली. यावेळी त्यांनी तरुण पिढी ज्या पद्धतीने मोबाइलच्या आहारी जात आहे त्यावरुन प्रचंड संतापही व्यक्त केला. एवढंच नव्हे तर मोबाइलवर कायद्याने बंदी आणली पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले. मोबाइलवर कायद्याने बंदी आणा असं का म्हणाले विक्रम गोखले? […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गुरुवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली अनेक राजकीय मतं रोखठोकपणे मांडली. यावेळी त्यांनी तरुण पिढी ज्या पद्धतीने मोबाइलच्या आहारी जात आहे त्यावरुन प्रचंड संतापही व्यक्त केला. एवढंच नव्हे तर मोबाइलवर कायद्याने बंदी आणली पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.

मोबाइलवर कायद्याने बंदी आणा असं का म्हणाले विक्रम गोखले?

‘ज्या तरुणांना माझी भाषा समजते, ज्यांना माझं कम्युनिकेशन समजतं. जे साधारण तरी शिकलेले आहेत.. बारावी वैगरे.. त्यांना मी नेहमी सांगतो की, सारखं मोबाइल.. सारखं ते टिकटॉक सारखे फोन.. काय जेवला, कोणता सिनेमा बघितला हे करण्यापेक्षा आपल्या देशाचा इतिहास समजून घ्या. देश दूर राहू द्या… महाराष्ट्राचा इतिहास तपासून पाहा.’

‘या तरुण मुलांना कोणीतरी हे सांगायला पाहिजे.. कोणीही सांगत नसेल आपल्याला त्याचं महत्त्व वाटत असेल तर आपल्याला ते सांगायला पाहिजे. जास्तीत जास्त काय होईल ते म्हणतील ये म्हातारड्या आम्हाला तुझं काही ऐकायचं नाही.. आम्हाला मोबाइलशीच खेळत बसायचंय… मग मी म्हणेन. तुम्ही कर्माने मरा..’

हे वाचलं का?