अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावामुळे ‘मविआ’तील मतभेद चव्हाट्यावर?

मुंबई तक

एनआयटी भुखंड घोटाळा प्रकरण असो की, अब्दुल सत्तारांचं गायरान जमीन वाटप मुद्दा… हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्याचंच सातत्यानं बोललं गेलं आणि दिसूनही आलं. त्यात आणखी एका मुद्द्याने भर टाकली आणि महाविकास आघाडीचीच सरकारविरोधात एकजुट नसल्याचं पुन्हा चव्हाट्यावर आलं. याला कारण ठरलं मविआचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय. कारण यात विधानसभेतील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एनआयटी भुखंड घोटाळा प्रकरण असो की, अब्दुल सत्तारांचं गायरान जमीन वाटप मुद्दा… हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्याचंच सातत्यानं बोललं गेलं आणि दिसूनही आलं. त्यात आणखी एका मुद्द्याने भर टाकली आणि महाविकास आघाडीचीच सरकारविरोधात एकजुट नसल्याचं पुन्हा चव्हाट्यावर आलं. याला कारण ठरलं मविआचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय. कारण यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवारांनीच वेगळी भूमिका मांडलीये.

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजण्याच्या एक दिवस आधी महाविकास आघाडीने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला. तसं पत्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना देण्यात आलं. महाविकास आघाडीने अचानक हा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, या निर्णयावरून महाविकास आघाडीत ताळमेळ नाहीये का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर उपस्थित होऊ लागला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधानसभेत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधिमंडळातील काँग्रेस पक्षाच्या दालनात महाविकास आघाडीची बैठक झाली. याच बैठकीत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांच्यावतीने तसं पत्र विधानसभा सचिवांना दिलं गेलं.

राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल : महाविकास आघाडीची मोठी खेळी

हे वाचलं का?

    follow whatsapp