Maharashtra Violence : अमरावतीत चार दिवस कर्फ्यू; शहरातील इंटरनेट सेवाही बंद
त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला अमरावती, नांदेड, मालेगावात हिंसक वळण लागलं. अमरावतीत सलग दुसऱ्या कालही (१३ नोव्हेंबर) हिंसाचाराचा भडका उडला. दोन समोरासमोर आल्यानंतर दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याबरोबरच चार दिवसांचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Internet services were shut down and a four-day curfew […]
ADVERTISEMENT

त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला अमरावती, नांदेड, मालेगावात हिंसक वळण लागलं. अमरावतीत सलग दुसऱ्या कालही (१३ नोव्हेंबर) हिंसाचाराचा भडका उडला. दोन समोरासमोर आल्यानंतर दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याबरोबरच चार दिवसांचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Internet services were shut down and a four-day curfew was imposed in Amravati)
अमरावतीत शुक्रवारी झालेल्या हिंसक घटनेच्या निषेधार्थ भाजपाने शुक्रवारी बंदची हाक दिली. मात्र, बंदला हिंसक वळण लागलं. दुपारपर्यंत शहरात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला. त्याचबरोबर पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांना भेटी देत नागरिकांना धीर दिला. त्याचबरोबर अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं.
Maharashtra violence : अमरावतीत पुन्हा हिसेंचा भडका; दगडफेक-जाळपोळ, संचारबंदी लागू
दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशीही हिंसेचा भडका उडाल्यानं अमरावती प्रशासनानं सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी खबरदारीचं पाऊल म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर दूरसंचार कंपन्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील इंटरनेट सेवा बंद केली. पुढील तीन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याचं शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितलं.