आसाम बनलं ऑपरेशन लोटसचं केंद्र?, आधी महाराष्ट्र अन् आता झारखंडवरती भाजपचा डोळा?

मुंबई तक

आसाम हे आजकाल ऑपरेशन लोटसचे (Operation Lotus) केंद्र बनले आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) सरकार पाडत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर झारखंडमध्येही ऑपरेशन लोटसची स्क्रिप्ट लिहिली जात होती असा आरोप भाजपवरती होत आहे. झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांना बंगाल पोलिसांनी मोठ्या रकमेसह अटक केली आहे. तेव्हापासून, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आसाम हे आजकाल ऑपरेशन लोटसचे (Operation Lotus) केंद्र बनले आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) सरकार पाडत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर झारखंडमध्येही ऑपरेशन लोटसची स्क्रिप्ट लिहिली जात होती असा आरोप भाजपवरती होत आहे. झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांना बंगाल पोलिसांनी मोठ्या रकमेसह अटक केली आहे. तेव्हापासून, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa sarma) चर्चेत आहेत. कारण एका काँग्रेस आमदाराने आरोप केला आहे की पक्षाचे तीन आमदार गुवाहाटीला जात होते आणि तेथून झारखंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्यावर चर्चा होणार होती.

काँग्रेसचे आमदार आसामला पोहोचण्यापूर्वीच पकडले नाहीतर…

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात बंडाचा नारा देणारे शिवसेनेचे आमदार गुजरातमार्गे आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले होते. आसाममधील पंचतारांकित हॉटेलमध्ये दहा दिवसांहून अधिक काळ तळ ठोकत महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्यात आले. हेमंत सोरेन सरकारविरोधात सत्तापालट करून भाजप सरकार स्थापन करण्याची कहाणी झारखंडमध्ये त्याच धर्तीवर लिहिली जाणार होती, पण काँग्रेसचे आमदार आसाममध्ये पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी पकडले.

झारखंडमधील काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन बिक्सल कोंगारी यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी मोठ्या रकमेसह अटक केली आहे. बंगालमधील रानीहाटी येथे राष्ट्रीय महामार्ग-16 वरून पोलिसांनी तीन आमदारांना एसयूव्ही गाडीमधून ताब्यात घेतले आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे आणखी एक आमदार कुमार जयमंगल सिंग यांनी आरोप केला की, पश्चिम बंगालमध्ये ज्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे, त्यांनी जयमंगल यांनाही फोन केला होता आणि त्यांना कोलकाता येथे येण्यास सांगितले होते.

‘बंडखोरी करुन जे आमदार येतील, त्या सर्वांना मंत्री बनवणार’

जयमंगल सिंह यांनी आरोप केला की तिन्ही आमदारांनी त्यांना असेही सांगितले की इथून सर्वजण गुवाहाटीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना भेटायला जातील. आणि तिथून भाजप सरकार बनवण्याचा विचार केला जाईल. बंडखोरी करत जे आमदार येतील, त्या सर्वांना मंत्री केले जाईल आणि प्रत्येक आमदाराला दहा कोटी रुपयेही मिळतील, असे आश्वासन दिल्याचा आरोप जयमंगल यांनी आपल्या पत्रात केला आहे. झारखंडमधील सध्याचे हेमंत सोरेन सरकार पाडून भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले जाणार असल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp