बीड: एसटी बसचा चक्काचूर.. बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, बीड: लातूर-औरंगाबाद एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तब्बल 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बस आणि ट्रकच्या हा अपघात एवढा भयंकर होता की, ज्यामध्ये संपूर्ण बसचा जवळजवळ चक्काचूर झाला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगावजवळ हा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून आणखी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमका अपघात कसा झाला?

आज (9 जानेवारी) सकाळी सात वाजेच्या सुमारास बस क्रमांक एम एच 20 बी एल टी 3017 ही बस लातूर येथून औरंगाबादकडे मार्गस्थ झाली. पण सायगावच्या जवळ आंबेजोगाईकडून लातूरकडे लोखंडी पाइपची वाहतूक करणारा एका ट्रकाला बसने रॉंग साईडने येऊन प्रचंड जोरदार धडक दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरच बस आणि ट्रकचा हा अपघात झाला.

यामध्ये पाच व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये एकूण 17 प्रवासी व 1 बालक प्रवास करत होते. ज्यापैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातनंतर सायगाव येथील नागरिकांनी मात्र जखमींना तात्काळ मदत केली. जखमींना त्यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.

ADVERTISEMENT

या अपघातानंतर हा संपूर्ण रस्ता बराच वेळ जाम झाला होता. मात्र, काही वेळाने अपघातग्रस्त बस हटविण्यात आली. ज्यानंतर येथील सगळी वाहतूक ही पूर्ववत झाली.

ADVERTISEMENT

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,उपविभागीय अधिकारी शरद झाडके, DYSP सुनील जायभाय, तहसीलदार विपीन पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्यासह अंबाजोगाईचे आगार प्रमुख नवनाथ चौरे, यांच्यासह आदींनी धाव घेतली.

सायगाव येथील नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने प्रवाश्यांना मदत मिळली असून हा अपघात धुकं आणि अरुंद असलेल्या रस्त्यामुळे झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत रस्त्याला डिव्हायडर आहेत पण बीड जिल्ह्याची सीमा लागताच त्या रस्त्यावर डिव्हाईडर नाहीत. त्यामुळेच हा अपघात घडला आहे. या अगोदर त्याच ठिकाणी अनेक अपघात घडलेले आहे. सतत अपघात होत असल्याने नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आमदार-खासदार पालकमंत्री व प्रशासकीय अधिकारी कधी याकडे लक्ष देणार? असा सवाल करत येणाऱ्या काळात आंदोलन करणार असल्याची माहिती सायगाव येथील नागरिकांनी दिली आहे.

अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या गाडीला भीषण अपघात, एअर बॅगमुळे थोडक्यात बचावले!

अपघातातील मृतांची नावं

  1. आदिल सलीम शेख (वय 29 वर्ष) रा. अंबाजोगाई

  2. चंद्रशेखर मधुकर पाटील कंडक्टर (वय 39 वर्ष) रा. कांचनवाडी, औरंगाबाद

  3. नलिनी मुकुंदराव देशमुख (वय 72 वर्ष) रा. ज्योतीनगर, औरंगाबाद

  4. सादेक पटेल (वय 55 वर्ष) रा. रॉकीनगर मशिदजवळ, लातूर

अपघातातील जखमींची नावं

  1. सुंदरराव ज्ञानोबा थोरात (वय 50 वर्ष), रा. पांगळी ता. धारूर

  2. हरिनाथ रंगनाथ चव्हाण (वय 67 वर्ष) रा. लातूर

  3. आसमत अतिम पठाण (वय 38 वर्ष) लातूर

  4. जियान फतीमा पठाण (वय 10 वर्ष) लातूर

  5. अलादीन अमीर पठाण (वय 20 वर्ष) निलंगा

  6. योगिता भागवत कदम (वय 40 वर्ष) लातूर

  7. भागवत निवृत्ती कांबळे (वय 55 वर्ष) लातूर

  8. संगीता बजरंग जोगदंड वय (वय 44 वर्ष) लातूर

  9. दस्तगीर आयुब पठाण वय (वय 19 वर्ष) निलंगा

  10. सुभाष भगवान गायकवाड (वय 43 वर्ष) पिंपळगाव

  11. आयान पठाण (वय 13 वर्ष) लातूर

  12. माधव नरसिंगराव पठारे (वय 65 वर्ष) जालना

  13. बळीराम संभाजी कराड (वय 22 वर्ष) रा.खोडवा सावरगाव

  14. प्रकाश जनार्दन ठाकूर (वय 55 वर्ष)

    follow whatsapp

    ADVERTISEMENT