कल्याण : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे भयंकर अपघात; कारचा चक्काचूर

मुंबई तक

राज्यभरात खड्डेमय रस्त्यांच्या मुद्दा चर्चिला जात असून, अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना कल्याण ग्रामीण भागातील कल्याण-शीळ रोड रस्त्यावर घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने अपघातात कारचा चालकाचा जीव थोडक्यात वाचला. कल्याण-शीळ रोडवर अर्धवट कामामुळे एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडीचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यभरात खड्डेमय रस्त्यांच्या मुद्दा चर्चिला जात असून, अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना कल्याण ग्रामीण भागातील कल्याण-शीळ रोड रस्त्यावर घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने अपघातात कारचा चालकाचा जीव थोडक्यात वाचला.

कल्याण-शीळ रोडवर अर्धवट कामामुळे एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडीचा चालक सुदैवाने बचावला असला, तरी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडीचा चुराडा झाला आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. या भयंकर अपघाताच्या घटनेमुळे रस्त्याच्या अधांतरी पडलेल्या कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Kalyan : गांधारी पूल वाहतुकीसाठी सुरक्षीत, २० तासांनी पूल वाहनचालकांसाठी खुला

अपघात कसा झाला?

हे वाचलं का?

    follow whatsapp