नागपूर कुणी पेटवलं? सभागृहात निवेदन, देवेंद्र फडणवीस यांची मोठी माहिती...

मुंबई तक

विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलासह काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी निषेधादरम्यान धार्मिक संदेश (कलमा) लिहिलेले कापड जाळले अशी अफवा मुस्लिम धर्मीयांमध्ये पसरली होती. त्यानंतर काही वेळाने वातावरण चिघळलं होतं. दरम्यान, यानंतर अचानक परिसरात दगडफेक आणि जाळपोळ झाली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काही जणांवर तलवारीनं हल्ला, पोलीस कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने वार

point

हिंसाचारात 33 पोलीस जखमी, 3 डीसीपी दर्जाच्या अधिकारी

point

काही घरांना, अस्थापनांना ठरवून टार्गेट

Devendra Fadnavis on Nagpur Violence : औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत, नागपूरमध्ये काल विहिंप आणि बजरंगदलने आंदोलन केलं. या आंदोलनानंतर शहरात संध्याकाळी तणाव निर्माण झाला. वाद वाढला आणि काही वेळ हिंसाचार झाला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन दिलं. हिंसाचाराच्या मुळाशी असलेल्या अफवांचा संदर्भ देत मुख्यमंत्री यांनी सविस्तर निवेदन दिलं.

हे ही वाचा >> Nagpur Curfew : नागपूरमध्ये कर्फ्यू लागू, कोणकोणत्या परिसरात निर्बंध, काय काय बंद?

नागपूरमध्ये काल संध्याकाळी एक अफवा पसरली आणि प्रतिकात्मक कबरीवर ठेवलेल्या पत्र्यावर धार्मिक चिन्ह असल्याचं सांगण्यात आलं. या अफवेमुळे प्रकरण तापलं आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या.

काही जणांवर तलवारीनं हल्ला...

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, घटनास्थळी 80 ते 100 लोक जमा झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात 12 दुचाकींचं नुकसान झालं.  एक क्रेन आणि दोन जेसीबीसह चारचाकी गाड्या जाळल्या. यावरून हिंसाचाराचे गांभीर्य लक्षात येते. याशिवाय काही जणांवर तलवारीनंही हल्लाही करण्यात आला.

हिंसाचारात 33 पोलीस जखमी झाले असून, त्यात 3 डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच 5 नागरिकांवरही हल्ले झाले आहेत. तर एका पोलीस कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने वार केले असं फडणवीस म्हणाले. हा सुनियोजित पॅटर्न दिसतोय. काही घरांना, अस्थापनांना ठरवून टार्गेट करण्यात आलं असंही फडणवीस म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp