कुठे लॉकडाउन तर कुठे जमावबंदी, जाणून घ्या राज्याची परिस्थिती!
नवीन वर्षात राज्यात कोरोना विषाणूवर लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सर्वांचा काहीसा भांड्यात पडला होता. परंतू अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईसह अमरावती, अकोला, यवतमाळ यासारख्या शहरांमध्ये निर्बंध कडक केले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ […]
ADVERTISEMENT

नवीन वर्षात राज्यात कोरोना विषाणूवर लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सर्वांचा काहीसा भांड्यात पडला होता. परंतू अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईसह अमरावती, अकोला, यवतमाळ यासारख्या शहरांमध्ये निर्बंध कडक केले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारने कोणत्या शहरात लॉकडाउन जाहीर केलंय आणि कोणत्या शहरात निर्बंध कडक केलेत याचा आपण आढावा घेणार आहोत.
१) अमरावती जिल्ह्यात विकेंड लॉकडाउन –
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळावं यासाठी अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे. यात दर आठवड्यातील शनिवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी आठपर्यंत सर्व बाजारपेठा आणि व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.