महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी; राहुल गांधींचं भाजप-संघावर टीकास्त्र

मुंबई तक

देशातील वाढत्या महागाईवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. आज ही रॅली वाढत्या महागाईविरोधात आहे. मात्र, देशात आज जी परस्थिती निर्माण झाली आहे, ती पूर्वी कधीही झाली नव्हती. देशातील जनता देश चालवत नसून, केवळ 3-4 भांडवलदार चालवत आहेत”, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देशातील वाढत्या महागाईवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. आज ही रॅली वाढत्या महागाईविरोधात आहे. मात्र, देशात आज जी परस्थिती निर्माण झाली आहे, ती पूर्वी कधीही झाली नव्हती. देशातील जनता देश चालवत नसून, केवळ 3-4 भांडवलदार चालवत आहेत”, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आज शक्तिप्रदर्शन करत जयपूरमध्ये रॅली काढली. या रॅलीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही उपस्थित होत्या. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारसह भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकास्त्र डागलं.

“देशात यापूर्वीही कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. देशातील सर्व स्वायत्त संस्था एका संघटनेच्या आणि एकाच हातात आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये आरएसएसचे (RSS) ओएसडी (OSD) बसले आहेत. 3-4 भांडवलदार देश चालवत आहेत,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp