बाबासाहेबांचं महाड सत्याग्रहातलं ‘ते’ गाजलेलं भाषण, जसंच्या तसं…

मुंबई तक

२० मार्च १९२७ ला महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला. हा सत्याग्रह म्हणजे समतेचा संगर. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून हा दिवस समता दिन, सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच महाड सत्याग्रह परिषदेत आपल्या अध्यक्षीय भाषणात समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठीच ही सभा बोलावण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. भारतातल्या समतेच्या लढ्यात महाडच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

२० मार्च १९२७ ला महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला. हा सत्याग्रह म्हणजे समतेचा संगर. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून हा दिवस समता दिन, सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच महाड सत्याग्रह परिषदेत आपल्या अध्यक्षीय भाषणात समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठीच ही सभा बोलावण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं.

भारतातल्या समतेच्या लढ्यात महाडच्या सत्याग्रहाला खूप महत्त्व आहे. सत्याग्रह परिषदेच्या सभेसाठी त्या काळात ७-८ हजार लोक बसू शकतील एवढा भव्य सभामंडप उभारण्यात आला होता. याच सभेला संबोधित करताना डॉ. आंबेडकरांनी या सभेची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली होती. डॉ. आंबेडकरांच्या याच ऐतिहासिक भाषणाचा संपादित अंश इथे देत आहोत.

सद्गृहस्थ हो!

सत्याग्रह कमिटीच्या आमंत्रणास मान देऊन आपण आज येथे आलात, याबद्दल कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांचे स्वागत करतो.

हे वाचलं का?