मटनाची आस लावून बसले, पण वाढलं चिकन, भर लग्न मंडपात तुफान हाणामारी

मुंबई तक

Crime News : बिहारमधील सहरसा येथे विवाह पार पडल्यानंतर मेजवानीत मटणाऐवजी चिकन वाढल्याचा आरोप करत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून वरपक्षातील सातहून अधिक जण जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मटनाची आस लावून बसले, पण वाढलं चिकन

point

भर लग्न मंडपात तुफान हाणामारी

Crime News : विवाहाचे सर्व धार्मिक विधी शांततेत पार पडले होते. वधू-वर विवाहबंधनात अडकले होते आणि उपस्थित पाहुणे मेजवानीसाठी पंगतीकडे वळले होते. मात्र, जेवणाच्या मेन्यूवरून अचानक वाद निर्माण झाला आणि आनंदाचे वातावरण काही क्षणांतच तणावपूर्ण बनले. ही घटना बिहारमधील सहरसा जिल्ह्यात घडली. सिमरी बख्तियारपूर येथील युवकाची वरात महिषी प्रखंडातील राजनपूर गावात पोहोचली होती. गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजता विवाह संपन्न झाला आणि त्यानंतर पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

हेही वाचा : जामीनावर सुटताच रक्तरंजीत कांड, पत्नी अन् पोरा-बाळांसह 6 जणांची हत्या

मटणाऐवजी चिकन वाढण्यात आल्याने वऱ्हाड संतापले 

वरपक्षाचा आरोप आहे की, विवाहापूर्वी मेजवानीत मटणाचा बेत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. मात्र, जेवण्यासाठी बसल्यानंतर त्यांच्या ताटात मटणाऐवजी चिकन वाढण्यात आले. यावर काही वऱ्हाडी मंडळींनी आक्षेप घेतला. सुरुवातीला झालेली शाब्दिक चर्चा काही वेळातच तीव्र वादात बदलली. दोन्ही बाजूंनी आवाज चढू लागले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. काही वेळापूर्वी एकमेकांना शुभेच्छा देणारे लोक एकमेकांसमोर उभे ठाकले.

हेही वाचा : घरात डोकावून पाहिल्याचा राग, क्षणात घेतला जीव; पाचगणीतील थरारक खुनाचा उलगडा

हे वाचलं का?