जामीनावर सुटताच रक्तरंजीत कांड, पत्नी अन् पोरा-बाळांसह 6 जणांची हत्या

मुंबई तक

Telangana Crime News : तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात POCSO प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सहा जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जामिनावर सुटल्यानंतर आरोपीने पत्नी, दोन मुलांसह तक्रारदार अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

Telangana Crime News
Telangana Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जामीनावर सुटताच रक्तरंजीत कांड

point

पत्नी अन् पोरा-बाळांसह 6 जणांची हत्या

Crime News : तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात शनिवारी पहाटे घडलेल्या सहा जणांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. शाबाद मंडलमधील दैवलागुडा गावात ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, POCSO कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेत तपासाची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.

हेही वाचा : नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, उझबेकिस्तानसह इतर राज्यांतील तरुणींची सुटका

 पीडितेसह तिच्या कुटुंबातील दोघांना संपवलं 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीची ओळख 28 वर्षीय राज कुमार अशी झाली आहे. तपासानुसार, आरोपीने सर्वप्रथम स्वतःची पत्नी पार्वती सरिता (30) आणि त्याचे दोन लहान मुलगे परीक्षित (3) व दैविकक्षित (2) यांची हत्या केली. त्यानंतर त्याने यापूर्वी स्वतःविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत तक्रार दाखल करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता त्या मुलीची आई चिट्याला लक्ष्मी (45) आणि आजी चिट्याला रुक्कम्मा (65) यांनाही आरोपीने ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले. या सहा हत्यांमुळे संपूर्ण गावात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Personal Finance: सोने-चांदी खरेदी करताना 'या' 10 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर होऊ शकते हजारोंचे नुकसान

हे वाचलं का?