मराठा आरक्षणाचं नेमकं काय होणार? वाचा अशोक चव्हाण यांनी काय दिलं उत्तर…
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान एक पत्र उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं आहे. केंद्र सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशीही विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 119 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी मराठा आरक्षण का दिलं होतं त्याचा एक भन्नाट किस्सा! […]
ADVERTISEMENT

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान एक पत्र उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं आहे. केंद्र सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशीही विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
119 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी मराठा आरक्षण का दिलं होतं त्याचा एक भन्नाट किस्सा!
अशोक चव्हाण यांनी सांगतिलं आहे की आपण सुप्रीम कोर्टाच्या निकालासंदर्भात एक समिती नेमली आहे. त्या समितीत अनेक कायदेतज्ज्ञ आहेत. आम्ही केंद्र सरकारवर कोणतीही जबाबदारी ढकललेली नाही. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णय़ानुसार आता आरक्षण द्यायचं की नाही? ते कुणाला द्यायचं ? कोणत्या जातीला मागस ठरवायचं हे सगळे अधिकार आता केंद्राला दिले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही राज्यपालांना आम्ही विनंती केली आहे. त्यांचा रोज राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याशी संपर्क असतो. त्यांनी हा प्रश्न आमच्या वतीने मार्गी लावण्यासाठी मदत करावी असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाची लढाई, आरक्षण आणि समोर असलेली आव्हानं