विदेशी नेत्यांना मिठी मारुन, बिर्याणी खायला जाऊन संबंध सुधारत नाही, मनमोहन सिंहांचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई तक

सध्या देशात पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचही राज्यांमध्ये प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षावर वारंवार टीकेची झोड उठवत आहेत. मोदींच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने थेट माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना मैदानात उतरवलं आहे. एका व्हिडीओ मेसेजद्वारे डॉ. मनमोहन सिंह यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सध्या देशात पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचही राज्यांमध्ये प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षावर वारंवार टीकेची झोड उठवत आहेत. मोदींच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने थेट माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना मैदानात उतरवलं आहे. एका व्हिडीओ मेसेजद्वारे डॉ. मनमोहन सिंह यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विदेशी नेत्यांना मिठी मारुन आणि बिर्याणी खायला जाऊन संबंध सुधारत नाहीत असा टोला डॉ, मनमोहन सिंह यांनी लगावला आहे.

सत्ताधारी आपल्या चुकांसाठी नेहरुंना धरत आहेत जबाबदार –

निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींनी अनेकदा पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या ध्येयधोरणांवर टीका केली होती. डॉ. मनमोहन सिंह यांनी हाच धागा पकडत नरेंद्र मोदींना सुनावलं आहे. भाजपनं पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी आणि राज्यातील लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे. आज देशाची स्थिती अशी आहे की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहेत तर गरीब अजून गरीब होत चालले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp