गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न 23 सप्टेंबरला होणार साकार; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत धावणार रेल्वे

मुंबई तक

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं बीड जिल्ह्यात रेल्वे यावी, असं स्वप्न होतं. मुंडेंचं स्वप्न होताना दिसत आहेत. यापूर्वी फक्त परळी येथे रेल्वेचे स्थानक होते. आता बीड जिल्ह्यातील आष्टी ते अहमदनगरदरम्यान नव्याने सुरुवात होणारी रेल्वे 23 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. या रेल्वेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनकुमार वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं बीड जिल्ह्यात रेल्वे यावी, असं स्वप्न होतं. मुंडेंचं स्वप्न होताना दिसत आहेत. यापूर्वी फक्त परळी येथे रेल्वेचे स्थानक होते. आता बीड जिल्ह्यातील आष्टी ते अहमदनगरदरम्यान नव्याने सुरुवात होणारी रेल्वे 23 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. या रेल्वेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनकुमार वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रामुख्याने आष्टी परिसरातील लोकांना आता रेल्वेतून प्रवास करायला मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला यश

अहमदनगर-बीड- परळी रेल्वे मार्ग व्हावा ही अनेक वर्षाची मागणी होती, ती आता प्रत्यक्षात उतरत आहे. आष्टी ते अहमदनगर रेल्वे प्रत्यक्षात धावणार असून त्यासाठीची तयारी युद्ध पातळीवर सुरु आहे.

काही महिन्यापूर्वी या ट्रॅकची रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण तपासणी करण्यात आली. या ट्रकवर तपासणीवेळी 120 किमी प्रती तास वेगाने रेल्वे धावून ट्रायल घेण्यात आला होता. त्यामुळे या ट्रॅकवर रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले होते प्रयत्न

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचे पूर्ण काम झाले आहे. आष्टी,कडा, सोलापूरवाडी आणि नारायणडोह हे स्टेशन पूर्ण झाले आहेत.या रेल्वे मार्गासाठी दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर, स्वर्गीय माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी खूप प्रयत्न केले होते . मागच्या काही वर्षात या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आणि या कामाने गती घेतली.अहमदनगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर लोहमार्गाचे काम ही पूर्ण झाले आहे.

परळी ते नगर 261 किमीचा आहे प्रकल्प

गेली 50 वर्ष या मार्गावर रेल्वे यावी अशी मागणी होत होती. 1990 साली या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. मात्र गेली अनेक वर्ष हे काम रखडलं होतं. ज्याला 2014 सालापासून गती मिळाली. परळी ते अहमदनगर 261 किमीपैकी सध्या 61 किमीचं अहमदनगर ते आष्टी हे काम पूर्ण झालं आहे. आष्टी ते बीड आणि बीड ते परळी हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. अजून 47 महत्त्वाचे पूल, 74 छोटे पूल, 52 रेल्वे ओव्हर ब्रिज, 24 रेल्वे अंडर ब्रिज आणि 17 स्टेशन इमारतींचं काम बाकीपूर्ण मार्गासाठी 1825 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकतायापैकी जवळपास 80 टक्के भूसंपादन पूर्ण झालं आहे.

या मार्गावर अहमनगरसह नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी, किनी, बावी, अंमळनेर,जाटनांदूर, इगनवाडी, रायमोह, राजुरी, बीड, मौज, घाटसावळी, वडवणी, तळेगाव, जवळा, शिरसाळा,टोकवाडी आणि सध्याचे परळी हे २३ स्टेशन्स आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp