सरकार म्हणतं WhatsApp यूजर्संनो घाबरु नका, सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी आहेत नवे नियम!

मुंबई तक

नवी दिल्ली: सरकारच्या डिजिटल नियमांबद्दल नुकतीच व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे आणि या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने असा दावा केला आहे की नवीन नियम कंपनीकडून यूजर्संना देण्यात येणाऱ्या ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’मध्ये हस्तक्षेप करतात. आता यालाच उत्तर देताना सरकारने असे म्हटले आहे की, ते लोकांच्या ‘गोपनीयतेच्या अधिकाराचा’ आदर करते आणि त्यांचा प्लान याचे उल्लंघन करावा असा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

नवी दिल्ली: सरकारच्या डिजिटल नियमांबद्दल नुकतीच व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे आणि या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने असा दावा केला आहे की नवीन नियम कंपनीकडून यूजर्संना देण्यात येणाऱ्या ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’मध्ये हस्तक्षेप करतात. आता यालाच उत्तर देताना सरकारने असे म्हटले आहे की, ते लोकांच्या ‘गोपनीयतेच्या अधिकाराचा’ आदर करते आणि त्यांचा प्लान याचे उल्लंघन करावा असा अजिबात नाही. माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी Koo वर याबाबतची माहिती पोस्ट केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘सरकार लोकांच्या गोपनीयतेचा पूर्ण आदर करते. सामान्य व्हॉट्सअॅप यूजर्सने या नवीन नियमांची भीती बाळगण्याची गरज नाही. नियमात नमूद केल्यानुासर विशिष्ट गुन्हे दाखल करण्यास कोणत्या मेसेजपासून सुरुवात झाली आणि ती कोणी केली हे शोधणं हा त्याचा मुख्य हेतू आहे.’

Twitter, Facebook आणि What’s App चं भारतात काय होणार?

ते पुढे म्हणाले की, ‘सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी नवीन नियम बनविण्यात आले आहेत. प्रश्न विचारण्याच्या अधिकारासह सरकार टीकाकारांचं देखील स्वागत करतं. नवे नियम हे फक्त सोशल मीडियाच्या सामान्य यूजर्संना सक्षम करतात जेव्हा ते गैरवर्तन आणि गैरवापराचे बळी ठरतात.’

हे वाचलं का?