राज्याची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल, राजेश टोपेंनी व्यक्त केली ‘ही’ भीती
महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढत असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या राज्य सरकारच्या चिंतेत भर पाडते आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला राज्यात लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही लोकं निर्बंधांचं पालन करत नसल्यामुळे पुन्हा लॉकडाउनची वेळ आल्याचा सूर टास्क फोर्सच्या बैठकीत लागला होता. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही आज […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढत असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या राज्य सरकारच्या चिंतेत भर पाडते आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला राज्यात लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही लोकं निर्बंधांचं पालन करत नसल्यामुळे पुन्हा लॉकडाउनची वेळ आल्याचा सूर टास्क फोर्सच्या बैठकीत लागला होता. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही आज राज्यात वाढत जाणारी रुग्णसंख्या पाहता आपण लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलंय.
“सध्याच्या घडीला राज्यात दर दिवशी १० टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ होते आहे. ही वाढ खरंच चिंताजनक आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ही वाढ अशीच राहिली तर आपल्याला रुग्णालयात बेड कमी पडतील की काय अशी शंका निर्माण झाली आहे. याचसोबत जर कोरोनाचा स्ट्रेन बदलला आणि नवीन म्युटेशनचे रुग्ण सापडले तर आरोग्य यंत्रणेवर नक्कीच ताण पडू शकतो. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये आढावा घेऊन निर्बंध अधिक कडक करण्याबाबत विचार सुरु आहे. आपली वाटचाल ही लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे. लोकांना आता गांभीर्याने वागावंच लागेल. मास्क घातले नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही तर लॉकडाऊन लावावंच लागेल.” राजेश टोपे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचंही सांगितलं. आजही अनेक लोकं आपल्यात सौम्य लक्षणं आढळली तरीही डॉक्टरांकडे जात नाहीत, घरीच थांबतात. काही वेळाने परिस्थिती गंभीर होते आणि मग ते डॉक्टरकडे जातात. त्यामुळे आपल्यात सौम्य लक्षणं दिसून आली तरी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्या असं आवाहन राजेश टोपेंनी यावेळी बोलत असताना केलं.
उप-राजधानीला कोरोनाचा विळखा, रविवारी ५८ जणांचा मृत्यू










