गृहमंत्री अनिल देशमुखांचं ‘ते’ पत्र जसंच्या तसं…

मुंबई तक

मुंबई: आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी काल (21 मार्च) मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडे महिन्याला १०० कोटींची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या याच आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील एक प्रसिद्ध पत्रक काढलं आहे. यावेळी त्यांनी हे सगळे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी काल (21 मार्च) मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडे महिन्याला १०० कोटींची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या याच आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील एक प्रसिद्ध पत्रक काढलं आहे. यावेळी त्यांनी हे सगळे आरोप खोटे असल्याचं म्हणत परमबीर सिंग यांनाच टार्गेट केलं आहे. पाहा अनिल देशमुख यांच्या त्या प्रसिद्ध पत्रकात नेमकं काय म्हटलं आहे

अनिल देशमुख यांचं पत्र जसंच्या तसं:

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त. श्री. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वत:चा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरुन श्री. परमबीर सिंग हे कसे खोट बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.

– सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचेवळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही?

हे वाचलं का?

    follow whatsapp