RJ केराबाई सरगर कशा झाल्या रेडिओ जॉकी?

इम्तियाज मुजावर

1998 पासून माणदेशकरांना रेडिओकडे खेचून आणणा-या आणि हम भी किसी से कम नहीं, असं प्रत्येक तरुणाला ठणकाउन सांगणा-या आरजे केराबाई सरगर यांचा आवाज म्हणजे सातारकरांचं प्रेम. साताऱ्यापासून 85 किलोमीटरवर असलेल्या म्हसवडमध्ये केराबाई सरगर यांचा आवाज आणि नावही प्रसिद्ध आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या माणदेशी तरंग 90.4 या कम्युनिटी रेडिओवर त्या लोकगीतांचे कार्यक्रम सादर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

1998 पासून माणदेशकरांना रेडिओकडे खेचून आणणा-या आणि हम भी किसी से कम नहीं, असं प्रत्येक तरुणाला ठणकाउन सांगणा-या आरजे केराबाई सरगर यांचा आवाज म्हणजे सातारकरांचं प्रेम.

साताऱ्यापासून 85 किलोमीटरवर असलेल्या म्हसवडमध्ये केराबाई सरगर यांचा आवाज आणि नावही प्रसिद्ध आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या माणदेशी तरंग 90.4 या कम्युनिटी रेडिओवर त्या लोकगीतांचे कार्यक्रम सादर करतात. लहानपणापासून आई आणि आजीची जात्यावरची गाणी ऐकल्याने आज रेडिओ शो करू शकत असल्याचं त्या सांगतात.

एका छोट्याशा गावापासून सुरू झालेला प्रवास माणदेशी तरंग रेडिओ स्टेशनपर्यंत कसा पोहोचला यावर त्या म्हणतात, आमच्या घरी एक मोठा रेडिओ होता. तो पुण्यातून आणला होता. त्याच्यावर मी सकाळ संध्याकाळ गाणी ऐकायचे. तो ऐकायला लागल्यावर, आपणही पुणे केंद्रावर किंवा सागली केंद्रावर जावं असं सारखं माझ्या मनात यायचं. त्यासाठी मी मुलाकडे हट्टही करायचे, केराबाई सांगतात. पण माणदेशी तरंगमध्ये पोहोचण्याचं खरं श्रेय त्या आपल्या मुलालाच देतात. मुलाचं म्हणजे संतोषचं म्हसवडमध्ये रोज येणं जाणं होतं. म्हसवडला त्याने माणदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्र सुरू झाल्याचा बोर्ड वाचला होता. त्यामुळे त्यानेच मला रेडिओ स्टेशनमध्ये पहिल्यांदा नेलं आणि प्रवास सुरू झाला तो आज गेली 15 वर्षं सुरू आहे, असं त्या सांगतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp