नवाब मलिक कोठडीमध्ये, आजच शिक्षा सुनावल्यानं काय साध्य होणार आहे?; हायकोर्टाचा सवाल
NCB चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांविरुद्ध दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणीदरम्यान आज हायकोर्टाने याचिकाकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या घाईबद्दल प्रश्न उपस्थित केला. नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. त्यामुळे आम्ही जरी त्यांना आजच शिक्षा सुनावली, तरीही त्याला काहीच अर्थ उरणार नाही, असं म्हणत हायकोर्टाने आजच्या दिवसाची सुनावणी स्थगित केली. वानखेडे यांच्या याकिवेर सुनावणी […]
ADVERTISEMENT

NCB चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांविरुद्ध दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणीदरम्यान आज हायकोर्टाने याचिकाकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या घाईबद्दल प्रश्न उपस्थित केला. नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. त्यामुळे आम्ही जरी त्यांना आजच शिक्षा सुनावली, तरीही त्याला काहीच अर्थ उरणार नाही, असं म्हणत हायकोर्टाने आजच्या दिवसाची सुनावणी स्थगित केली.
वानखेडे यांच्या याकिवेर सुनावणी सुरु असताना, Advocate फिरोज भरुचा यांनी कोर्टासमोर येत याचिका मागे ठेवण्याची विनंती करत ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय मलिक यांची बाजू मांडणार असल्याचं सांगितलं. यावेळी जस्टीस एस.जे.काठावाला यांनी मलिक हे आधीच अटकेत आहेत. त्यामुळे जरीही त्यांना आम्ही आज शिक्षा सुनावली त्याने काय साध्य होणार आहे? असा प्रश्न विचारला. ज्यावर भरुचा यांनी निर्णय देण्याआधी आमची बाजू ऐकून घेण्याची विनंती केली.
नवाब मलिक यांनी ईडीने 23 फेब्रुवारीला अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची बहिण हसीना पारकरसोबत नवाब मलिक यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांची ईडी सध्या चौकशी करत आहे. मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहे. जस्टीस काठावाला यांनी मलिकांच्या कोठडीची तारीख विचारली असता भरुचा यांनी ते 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत असल्याचं सांगितलं.
लवासामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना स्वारस्य, याचिका फेटाळताना बॉम्बे हायकोर्टाचं निरीक्षण
समीर वानखेडे यांच्या वडीलांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला होता. यावरील सुनावणीदरम्यान नवाब मलिक यांनी हायकोर्टासमोर प्रतिज्ञापत्र लिहून देताना वानखेडे परिवाराबद्दल कोणतंही वक्तव्य करणार नाही अशी हमी दिली होती. परंतू ही हमी मोडत नवाब मलिक यांनी वानखेडे परिवारावर टीका केल्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांवर कारवाईची मागणी केली होती. ज्याला उत्तर देताना नवाब मलिकांनी आपण कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला नसल्याचं सांगितलं होतं.
एका राजकीय पक्षाचा प्रवक्ता असल्यामुळे केंद्रीय यंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींवर भाष्य किंवा टीका करणं हा आपला अधिकार असल्याचं मलिकांनी सांगितलं होतं. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्याच्या कामाविषयी मी केलेलं भाष्य हे कोर्टाच्या अवमानासाठी ग्राह्य धरलं जाऊ नये असंही मलिक म्हणाले होते. दरम्यान आजच्या सुनावणीदरम्यान वानखेडे परिवाराची बाजू मांडणारे वकील बिरेंद्र सराफ यांनी सुनावणी स्थगित करण्यासाठी आपली काहीच हरकत नसल्याचं सांगितलं. ज्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणातली सुनावणी एक आठवड्यासाठी स्थगित केली आहे.
नवरा सीमेवर असताना तुम्ही परपुरुषासोबत हॉटेलमध्ये गेलात – सुप्रीम कोर्टाने महिलेला फटकारलं