आदित्य ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्या ‘त्या’ भेटीत काय घडलं?; राऊतांनी ‘रोखठोक’मधून उत्तर

मुंबई तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबईच्या दौऱ्यावर येऊन गेल्या. या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली. ममतांच्या दौऱ्यावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्या टीकेनंतर राऊतांनी भाजपला उत्तर देत भेटीतील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबईच्या दौऱ्यावर येऊन गेल्या. या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली. ममतांच्या दौऱ्यावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्या टीकेनंतर राऊतांनी भाजपला उत्तर देत भेटीतील चर्चेची माहिती ‘रोखठोक’मधून दिली.

संजय राऊत म्हणतात…

‘दिल्लीत ममता बॅनर्जी यांना भेटण्याचा योग अनेकदा येतो. मुंबईच्या ‘ट्रायडेण्ट’ हॉटेलात आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने त्यांना भेटलो. ममता मुंबईतील उद्योगपतींना भेटण्यासाठी आल्या. उद्योगपतींनी प. बंगालात यावे हे निमंत्रण घेऊन त्या आल्या. त्यांनी उद्योगपतींची बैठक विनम्रपणे बोलावली. तेव्हा मला गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुंबई दौऱ्याची आठवण झाली. मुंबईतील उद्योगपतींना गुजरातेत येण्याचे निमंत्रण घेऊन त्या आल्या व मुंबईत येऊन मुंबईचीच बदनामी करून गेल्या. ‘मुंबई में क्या रखा है? इथले रस्तेही खराब आहेत. तेव्हा गुजरातला चला.’ असे निमंत्रण त्यांनी दिले. तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.”

“ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील विकासाचे उद्योगपतींकडे कौतुक केले व प. बंगालकडे दृष्टी वळवा, असे सांगितले. शेवटी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, पण महाराष्ट्राचीही ती राजधानी आहे. याचे भान ठेवून जे राज्यकर्ते मुंबईत उतरतात त्यांचे स्वागत आहेच. देशाचा आर्थिक भार मुंबईच्या डोक्यावर आहे. मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राच्या राजधानीने हातभार लावला तर ते राष्ट्रीय कार्यच ठरेल.”

हे वाचलं का?

    follow whatsapp