महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजारांहून जास्त नवे Corona रूग्ण, 159 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 108 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 159 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज महाराष्ट्रात 4 हजार 736 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 62 लाख 52 हजार 150 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.04 टक्के इतका झाला […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 108 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 159 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज महाराष्ट्रात 4 हजार 736 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 62 लाख 52 हजार 150 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.04 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 30 लाख 48 हजार 70 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 42 हजार 788 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 93 हजार 147 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 2334 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 50 हजार 393 सक्रिय रूग्ण आहेत.

25 ऑगस्ट: राज्यात 5 हजार 31 नवे कोरोनाबाधित आढळले होते. 4 हजार 380 रूग्ण करोनातून बरे झाले होते. तर 216 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला होता.










