मुंबई-पुण्यातील लोकांची लसीसाठी ग्रामीण भागात धाव, गावकरी मात्र संतप्त
मुंबई: कोरोनावर (Corona) मात करायची असेल तर प्रत्येकाने लस (Vaccine) घेणं हे खूप गरजेचं आहे. खरं तर या गोष्टीचं महत्त्व पटल्याने अनेक जण मोठ्या प्रमाणात लस घेत आहेत. पण आता यामुळे एक नवीच समस्या निर्माण झाली आहे. ती म्हणजे शहरी भागातील (Urban Area) अनेक नागरिक हे ग्रामीण भागात जाऊन लसीकरण (Vaccination) करुन घेत आहेत. त्यामुळे […]
ADVERTISEMENT

मुंबई: कोरोनावर (Corona) मात करायची असेल तर प्रत्येकाने लस (Vaccine) घेणं हे खूप गरजेचं आहे. खरं तर या गोष्टीचं महत्त्व पटल्याने अनेक जण मोठ्या प्रमाणात लस घेत आहेत. पण आता यामुळे एक नवीच समस्या निर्माण झाली आहे. ती म्हणजे शहरी भागातील (Urban Area) अनेक नागरिक हे ग्रामीण भागात जाऊन लसीकरण (Vaccination) करुन घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील (Rural Area) नागरिकांना लस मिळेनाशी झाली आहे. खरं तर शहरातील अनेक जण हे मोबाइलवरुन आपला स्लॉट बुक करुन नोंदणीसाठी ग्रामीण भागात जात आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मात्र लसीपासून वंचित राहत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
पुणे, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्यात असे प्रकार सर्रास घडत असल्याचं आता समोर येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये याविषयी प्रचंड नाराजी असल्याचं दिसून येत आहे.
सध्या राज्यात लॉकडाऊन असल्याने जिल्हा बंदी देखील आहे. मात्र लसीकरणासाठी सूट असल्याने शहरी भागातील अनेक नागरिक हे आपल्या खासगी वाहनांनी शेजारच्या जिल्ह्यात जाऊन लस घेत असल्याचं देखील समोर आलं आहे. अशावेळी आता लसीकरणाबाबत एक निश्चित धोरण ठरविण्याची मागणी केली जात आहे.
भारताने 80 देशांना 6 कोटींपेक्षा जास्त Vaccines पाठवल्या, मोदींच्या निर्णयामुळे लस तुटवडा!