वसईत घरावर कोसळली दरड, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, दोनजण जखमी

मुंबई तक

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने मुक्काम ठोकला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकूळ सुरू असून ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, बुधवारी पहाटेपासून मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. वसईत घरावर कोसळली दरड, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, दोनजण जखमी पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील राजीवली गावातील वाघराळपाडा […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने मुक्काम ठोकला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकूळ सुरू असून ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, बुधवारी पहाटेपासून मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे.

वसईत घरावर कोसळली दरड, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, दोनजण जखमी

पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील राजीवली गावातील वाघराळपाडा येथे बुधवारी (१३ जुलै) अतिवृष्टी झाल्यानं दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून एक घर दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. यात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत.

अमित ठाकूर (वय ३५), रोशनी ठाकूर (वय १४) अशी मृतांची नावं आहेत. तर वंदना अमित ठाकूर (वय ३३), ओम अमित ठाकूर (वय १०) अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत. मयत व्यक्तीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या वारसांना शासन नियमाप्रमाणे नुकसानभरपाई करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी दिली.

चंद्रपुरात पुराच्या पाण्यात अडकली बस, प्रवाशांच्या सुटकेचा थरारक व्हीडिओ समोर

राज्यातील पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लक्ष

राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp