बोकड, कोंबड्या ठेवून आणि नवस बोलून सरकार पडत नाही, नवाब मलिक यांचं राणेंना उत्तर

मुंबई तक

देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी करुन थकले. त्यांची भविष्यवाणी खरी होईना म्हटल्यावर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करु लागले मात्र आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे . 23 वर्षांपूर्वी नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळापासून नवसाचे बोकड आणि कोंबड्या दाखवल्या जात आहेत आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी करुन थकले. त्यांची भविष्यवाणी खरी होईना म्हटल्यावर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करु लागले मात्र आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे .

23 वर्षांपूर्वी नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळापासून नवसाचे बोकड आणि कोंबड्या दाखवल्या जात आहेत आणि आता त्या कोंबड्या आणि बोकडांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावं लागतं आहे असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आणखी काय म्हणाले नवाब मलिक?

आमचे महाविकास आघाडी सरकार खंबीर आहे आणि ते पाच वर्ष पूर्ण करेल. अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांसाठी सरकार बनवले नाही तर 25 वर्षांसाठी टिकेल असे जाहीर केलं आहे. महाराष्ट्रात सरकार आल्यापासून हे सरकार पडेल अशा वल्गना केल्या जात आहेत. नारायण राणे जे काही बोलले त्याला काही अर्थ नाही. त्यांना नवी जबाबदारी देण्यात आली म्हणून ते बोलत आहेत.

नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य; ‘नववर्षात महाराष्ट्रात भाजपचं सरकार’

काय म्हणाले आहेत नारायण राणे?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असं म्हटलं आहे की मार्च 2022 पर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार स्थापन होईल. त्यानंतर महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते सगळं काही ठीक होईल असंही नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. जयपूरमध्ये नारायण राणे बोलत होते. नारायण राणे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? या चर्चा रंगल्या आहेत. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीत रवाना झाले आहेत. शरद पवार, प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते दिल्लीत आहेत. तर देवेंद्र फडणवीसही आज दिल्लीत पोहचले आहेत.

नाना पटोलेंची प्रतिक्रिया काय?

मार्च महिन्यात भाजप सरकार सत्तेवर येणार या नारायण राणे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली आहे ,नाना पटोले म्हणाले की भाजपा भविष्यवाणी करणारा पक्ष आहे, त्यांची भविष्यवाणी खरी ठरत नाही, त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही ,त्यांच्या भविष्यवाणी ला काही अर्थ राहिलेला नाही, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारी पूर्ण पाच वर्षे चालेल.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

शरद पवार हे दिल्लीत गेले आहेत यात नवीन काय? ते देशाचे नेते आहेत. सगळ्याच प्रमुख पक्षांचे नेते दिल्लीत आहेत. त्यातून वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे. भाजपचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत कारण त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीत आहेत. त्यांना मस्टरवर सही करायला जावं लागेल. महाराष्ट्राचं सरकार व्यवस्थित सुरू आहे. आता या चर्चांना काही अर्थ नाही. दोन वर्षे व्यवस्थित गेली आहेत. पाच वर्षे हे सरकार व्यवस्थित पूर्ण करणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp