इराक, इराणप्रमाणे 2024 नंतर जनता लफंग्यांना रस्त्यावर उतरून मारेल: संजय राऊत
Sanjay Raut Angry on BJP नवी दिल्ली: लिबिया, इराण आणि इराकमध्ये ज्या पद्धतीने जनेतेने हुकूमशाही असलेल्या लोकांना जनतेने रस्त्यावर उतरून मारलं होतं तसंच 2024 नंतर या लफंग्यांना जनता रस्त्यावर उतरून मारेल. असं वक्तव्य करत शिवसेना (Shiv Sena) UBT पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सदानंद कदम (Sadanand Kadam) आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर […]
ADVERTISEMENT

Sanjay Raut Angry on BJP नवी दिल्ली: लिबिया, इराण आणि इराकमध्ये ज्या पद्धतीने जनेतेने हुकूमशाही असलेल्या लोकांना जनतेने रस्त्यावर उतरून मारलं होतं तसंच 2024 नंतर या लफंग्यांना जनता रस्त्यावर उतरून मारेल. असं वक्तव्य करत शिवसेना (Shiv Sena) UBT पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सदानंद कदम (Sadanand Kadam) आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी (ED) कारवाईवर संताप व्यक्त केला. (people will kill authoritarian tendencies on the streets after 2024 like iraq iran sanjay raut angry on bjp)
‘हे सगळे लफंगे आहेत.. 2024 नंतर या लफंग्यांना जनता रस्त्यावर पकडून मारेल. अनेक देशात, जगात अशा घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या लोकांना.. लिबिया असेल, इराक असेल.. इराण असेल.. इथे अशाप्रकारच्या लोकांना जनतेने धरून मारलं आहे.. अशा प्रकारच्या हुकूमशाही असलेल्या लोकांना.’ अशा शब्दात राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.
‘एक गद्दार खासदार जनतेचा मार खाता-खाता वाचला’
‘मी काल स्वत: ठाण्यात होतो. शिवजयंतीच्या एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. मी जे चित्र ठाण्यात पाहिलं ते म्हणजे.. बाळासाहेबांनी जी शिवसेना ठाण्यात रुजवली, वाढवली. त्या चित्रात मला कुठेही बदल दिसला नाही. त्यात कोणी म्हणत असेल की, आम्हीच ठाण्याचे राजे.. नाही शिवसेना.. भले तुम्हाला निवडणूक आयोगाने काही मजकूर खरडून दिला असेल.. म्हणून शिवसेना तुमची होत नाही. ठाण्यातील शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे आहे.’
‘मुख्यमंत्र्यांच्या सभेत काय झालं मला माहित नाही. पण भविष्यात अशाप्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल. इचलकरंजीमध्ये एक गद्दार खासदार जनतेचा मार खाता-खाता वाचला. जनतेने त्यांची गाडी अडवली, त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. त्यांच्या अंगावर जनता गेली. म्हणजे मला तर वाटत होतं की, जनता आता याला पकडून मारतेय की काय रस्त्यात पकडून.. ही चीड लोकांच्या मनात आहे.’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले.