Letter Bomb: प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंशी खासगीत बोलायला हवं होतं-भुजबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना जो त्रास होतो आहे त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी खासगीत बोलायला हवं होतं. ईडी, आणि इतर यंत्रणांच्या त्रासामुळेच प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब पडला आहे. शरद पवार, एकनाथ खडसे आणि मलाही या ED आणि यंत्रणांनी असाच त्रास दिला. आम्ही ताकदीने उभे राहिलो असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. या लेटरबॉम्बचा सरकारवर काही परिणाम होईल का? असं विचारलं असता भुजबळ म्हणाले ‘शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत राज्य सरकारला अजिबात धोका नाही.’ असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

सरनाईकांच्या पत्रावर फडणवीस म्हणतात, कोणाला जोडे मारायचे कोणाला हार घालायचे हे त्यांनीच ठरवायचं !

आणखी काय म्हणाले छगन भुजबळ?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा ही मागणी मी बैठकीत चिठ्ठी लिहून केली होती असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. निवडणुका पुढे ढकला किंवा इम्पेरिकल डेटा द्या अशी मागणी मी केली होती असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. ओबीसींचे प्रश्न सुटावेत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पावलं उचलतील ही अपेक्षा मला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं ‘ते’ खळबळजनक पत्र जसंच्या तसं…

ADVERTISEMENT

काय आहे प्रताप सरनाईक यांचं पत्र प्रकरण?

ADVERTISEMENT

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रात थेट म्हटलं आहे की, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे आपलाच पक्ष कमकुवत करत असतील तर आपण पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेतलेले बरे होईल.’

ठाण्यातील हेविवेट आमदार म्हणून ओळखले जाणारे प्रताप सरनाईक यांच्या अशा स्वरुपाच्या पत्रामुळे संपूर्ण शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांनी पत्रात सरळसरळ असं म्हटलं आहे की, आपण राज्यात भाजपची साथ सोडल्यामुळेच आपल्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे.

‘कोणताही गुन्हा नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. पण आपल्या एका निर्णयामुळे हे सगळं कुठेतरी थांबू शकेल.’ असं थेट आवाहन प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे.

प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी सुरु झाल्यापासून ते जवळजवळ अज्ञातवासात गेले होते. पण आता सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत.’

‘आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल.’ असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला सरकार सोडून भाजपसोबत जाणाचा जवळजवळ सल्लाच दिला आहे.

याच पत्राबाबत आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही याबाबत प्रतिक्रिया देऊन याबाबत प्रताप सरनाईक यांनी याबाबत उद्धव ठाकरेंशी खासगीत बोलायला हवं होतं असं म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT