राष्ट्रपती पदाची निवडणूक दोनच उमेदवार का लढतात?
देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूक होत आहेत. या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार रिंगणात आहे. सत्ताधारी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू, तर संयुक्त विरोध पक्षानं यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिलीये. पण, १९९७ पासून आतापर्यंत झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दोनच उमेदवार का असतात? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर त्यामागे एक नियम आहे आणि हा नियम कसा बनला? […]
ADVERTISEMENT

देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूक होत आहेत. या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार रिंगणात आहे. सत्ताधारी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू, तर संयुक्त विरोध पक्षानं यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिलीये. पण, १९९७ पासून आतापर्यंत झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दोनच उमेदवार का असतात? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर त्यामागे एक नियम आहे आणि हा नियम कसा बनला? त्याचा एक राजकीय किस्सा देखील आहे. हा नियम नेमका काय आहे? आणि तो का लागू करण्यात आला? हेच जाणून घेऊयात.
एक राजकीय किस्सा अन् भासली नियमाची गरज –
१९९७ म्हणजे जवळपास दोन दशकांपासून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दोनच उमेदवार रिंगणात असतात. त्यापूर्वीही असंच होतं का? तर नाही. सालं होतं १९६७. या वर्षी देशाला पहिले मुस्लीम राष्ट्रपती मिळणार होते. ते विजयी होणार हे जवळपास निश्चित होतं. पण, या निवडणुकीत असं काही झालं की थेट राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा नियम बदलावा लागला. १९६७ च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तब्बल १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ९ उमेदवार असे होते की ज्यांना एकही मत मिळालं नाही. अपेक्षेप्रमाणे झाकीर हुसेन देशाचे राष्ट्रपती झाले. पण, याच निवडणुकीपासून गंभीर नसणाऱ्या उमेदवारांना रोखण्याची गरज भासली.
१९७४ मध्ये बदलला नियम –