Rahul Gandhi Speech : अदाणींवरून मोदींना घेरलं! गांधींनी चढवला हल्ला
Rahul Gandhi Todays speech in Parliament : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget Session) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी अदाणी समूह आणि हिंडेनबर्ग अहवालाचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारला (Modi Government) घेरलं. राहुल गांधी यांनी गौतम अदाणी (Gautam Adani) यांचा फोटो झळकावत त्यांच्या झटपट यशाचं कारण काय आहे? असं म्हणत मोदी सरकारवर प्रश्नांचा […]
ADVERTISEMENT

Rahul Gandhi Todays speech in Parliament : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget Session) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी अदाणी समूह आणि हिंडेनबर्ग अहवालाचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारला (Modi Government) घेरलं. राहुल गांधी यांनी गौतम अदाणी (Gautam Adani) यांचा फोटो झळकावत त्यांच्या झटपट यशाचं कारण काय आहे? असं म्हणत मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. (rahul gandhi attacks on modi Government over adani hindenburg Report).
लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “मी पदयात्रा केली. यात्रेत मला असं काही ऐकायला मिळालं की, जे मी यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं. कारण आपल्या सगळ्यांमध्ये अहंकार असतो की, स्वतःचंच म्हणणं मांडायचं. जेव्हा आम्ही 500 ते 600 किमी चालून गेल्यानंतर लोकांचा आवाज आम्हाला ऐकायला यायला लागला.”
राहुल गांधी म्हणाले, “तरुण येत होते आणि सांगत होते की आम्ही बेरोजगार आहोत. आम्ही प्रश्न विचारायचो. कुणी म्हणायचं शिक्षण झालं, कुणी म्हणायचं गाडी चालवतो. शेतकरी भेटले. त्यांनी पंतप्रधान पीक विमाबद्दल सांगितलं. पैसे भरतो, पण पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांनीही असंही सांगितलं जमीन घेतली जाते पण योग्य मोबदला दिला जात नाही.”
“जमीन अधिग्रहण विधेयक लागू होत नाही. आदिवासी कायद्यानुसार जे दिलं जातं, ते आज हिसकावून घेतलं जात आहे, असं आदिवासींनी सांगितलं. मुख्य मुद्दा होता बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी. लोकांनी अग्निवीरबद्दलही सांगितलं.”










