राज ठाकरे म्हणाले, ते खरंय; देश सोडलेल्या उद्योगपतींचा आकडा ऐकून चक्रावून जाल, भारत टॉप 3 मध्ये

मुंबई तक

राजकारणामुळे सामाजिक वातावरण कलुषित होत असून, आपल्याकडचे उद्योगपती देश सोडून बाहेर जाताहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली होती. देश सोडून गेलेल्या उद्योगपतींचा आकडाही ठाकरेंनी सांगितला. राज ठाकरे बोलले ते खरं असून, त्यांनी सांगितलेल्या आकड्यापेक्षा किती पटीने देशातून उद्योगपतींनी पलायन केलंय. देश सोडून गेलेल्या जगभरातील देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांक आहे. रशिया-चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राजकारणामुळे सामाजिक वातावरण कलुषित होत असून, आपल्याकडचे उद्योगपती देश सोडून बाहेर जाताहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली होती. देश सोडून गेलेल्या उद्योगपतींचा आकडाही ठाकरेंनी सांगितला. राज ठाकरे बोलले ते खरं असून, त्यांनी सांगितलेल्या आकड्यापेक्षा किती पटीने देशातून उद्योगपतींनी पलायन केलंय. देश सोडून गेलेल्या जगभरातील देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांक आहे.

रशिया-चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या क्रमांकावर

एकीकडे जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योगपतींचे वलय असताना दुसरीकडे मोठ्या संख्येने भारतीय उच्चभ्रूंचा देशाविषयी भ्रमनिरास झालेला दिसत आहे. आकडेवारी सांगते की 2022 मध्येच हजारो कोट्यधीशांनी भारताला टाटा म्हटले आहे. हेन्ले अँड पार्टनर्सने आपल्या अहवालात याबाबत खुलासा केला आहे. त्यानुसार जगातील तीन देशांमध्ये भारताचा समावेश झाला असून, करोडपतींनी भारत सोडला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर रशिया तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे.

8 हजार कोट्यधीशांनी केलं पलायन

बिझनेस इनसाइडरवर प्रसिद्ध झालेला हेन्ली अँड पार्टनर्सचा अहवाल पाहता भारतासह अनेक देशांतील करोडपती आपला देश सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होण्याला अधिक प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते. अहवालात दिलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 2022 मध्ये 8,000 करोडपती भारतातून स्थलांतरित झाले आहेत. या प्रकरणात आघाडीवर असलेल्या रशियातून स्थलांतरित झालेल्या लक्षाधीशांची संख्या यंदा 15,000 झाली आहे, तर या काळात चीनमधून 10,000 श्रीमंतांनी स्थलांतर केले आहे.

कोविड-19 महामारीच्या काळात हाय नेटवर्थ संपत्ती असलेल्या लोकांच्या देश सोडून जाण्याच्या योजनेला थोडा ब्रेक लागला होता, परंतु आता पुन्हा श्रीमंतांनी परदेशात स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे आणि ताजी आकडेवारी याचे एक उदाहरण आहे. विशेष म्हणजे, उच्च नेटवर्थ संपत्ती असलेल्या लोकांमध्ये अशा श्रीमंत लोकांचा समावेश आहे ज्यांची संपत्ती दहा लाख डॉलर्स किंवा त्याहून अधिक आहे. मात्र, या निर्गमनासोबतच भारतात नवीन करोडपतींच्या संख्येतही वाढ होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp