महाविकास आघाडीतून राजू शेट्टी बाहेर पडणार? रविवारी मोठी घोषणा?

मुंबई तक

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ही बंडखोरी शमवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिष्टाई यशस्वी ठरू शकलेली नाही. राजू शेट्टी यांच्याशी आमचा संपर्क आहे, त्यांच्या काही तक्रारी आहेत. भविष्यात त्यांचे समाधान करण्याविषयी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ही बंडखोरी शमवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिष्टाई यशस्वी ठरू शकलेली नाही. राजू शेट्टी यांच्याशी आमचा संपर्क आहे, त्यांच्या काही तक्रारी आहेत. भविष्यात त्यांचे समाधान करण्याविषयी आमची चर्चा झाली आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राजू शेट्टी यांनीही उमेदवाराशी संपर्क साधला मात्र काही अडचणींमुळे त्यांचा अर्ज निघाला नाही असंही उत्तर जयंत पाटील यांनी दिलं आहे. मात्र राजू शेट्टी हे लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. एवढंच नाही तर रविवारीच यासंदर्भातली घोषणा केली जाईल अशीही माहिती समोर येते आहे.

पंढरपूर : JCB मधून मिरवणूक, ७६ जणांविरोधात गुन्हा दाखल

या सगळ्या गोष्टी घडल्याने आणि जयंत पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिल्याने राजू शेट्टींच्या मनात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. रविवारी राजू शेट्टी, रविकांत तूपकर यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील हे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना मोठा फटका बसण्याची शक्यताही आहे.

Sanjay Raut यांची ‘डिनर डिप्लोमसी’

हे वाचलं का?

    follow whatsapp