उद्धव ठाकरेंनी परत बोलावलं तर जाणार का?; दीपक केसरकरांनी ठेवल्या दोन अटी

मुंबई तक

तब्बल दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेला जोरदार झटका बसलाय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे आमदार सत्तेत आले आहेत. सत्तांतरानंतर आमदारांकडून पुन्हा मातोश्रीवर जाण्याचे संकेत दिले जाताहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास परत जाऊ, म्हणत काही अटी ठेवल्या आहेत. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील आपल्या कार्यालयात जाऊन पदभार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

तब्बल दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेला जोरदार झटका बसलाय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे आमदार सत्तेत आले आहेत. सत्तांतरानंतर आमदारांकडून पुन्हा मातोश्रीवर जाण्याचे संकेत दिले जाताहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास परत जाऊ, म्हणत काही अटी ठेवल्या आहेत.

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील आपल्या कार्यालयात जाऊन पदभार घेतला. यावेळी अनेकजण उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत समेट घडवून आणण्याबद्दलच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली.

‘आम्ही जा म्हटलेलं नव्हतं, पण आता…’; शिवसेना आमदाराचं बंडखोर आमदारांना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंनी परत बोलावलं तर तुमची भूमिका काय असणार? या प्रश्नावर बोलताना दिपक केसरकर म्हणाले, “मी तुम्हाला एवढंच सांगितलं की, जेव्हा कुटुंबामध्ये असा प्रसंग येतो. आता काय झालंय की, आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आम्ही सर्व आमदार आणि भाजप सत्तेमध्ये आलो आहेत. म्हणजे एक प्रकार कुटुंब तयार झालं आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp