रिचा चड्ढाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; कडक कारवाईच्या तयारीत आहे शिवराज सरकार

मुंबई तक

अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने गलवानबाबत केलेल्या ट्विटवर मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ऋचाविरोधात तक्रार आल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. याची चौकशी केल्यानंतर अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. अभिनेत्री ऋचा चड्डा हिने लष्कराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशातील देशभक्त दुखावले असल्याचे गृहमंत्री मिश्रा म्हणाले. ऋचा जी, ती आर्मी आहे सिनेमा नाही. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने गलवानबाबत केलेल्या ट्विटवर मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ऋचाविरोधात तक्रार आल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. याची चौकशी केल्यानंतर अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

अभिनेत्री ऋचा चड्डा हिने लष्कराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशातील देशभक्त दुखावले असल्याचे गृहमंत्री मिश्रा म्हणाले. ऋचा जी, ती आर्मी आहे सिनेमा नाही. कधी मायनस ३० अंश, ४५ अंशात राहून पहा. उष्माघाताच्या वेळी ४५ अंश तापमानात काम करून पहा, तुम्हाला लष्कराचे श्रम आणि त्याग समजेल. रील लाईफ आणि रिअल लाईफ यात फरक आहे. ती सेना आहे सिनेमा नाही की तोंड वर करून काहीही बोलाल. सैन्याचा आदर करायला शिका ऋचा जी, असं मिश्रा म्हणाले.

यासोबतच रिचा चड्डा हिच्या वक्तव्यामुळे देशभक्त दुखावले असल्याचेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. अभिनेत्री ऋचाची तुकडे-तुकडेवाली मानसिकता जगासमोर आली आहे. मुलगी श्रद्धाचे 35 तुकडे करण्यात आले, पण तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. पण जिथे देश आणि लष्कराच्या विरोधात बोलायचे असते तिथे ती आघाडीवर दिसते. अगदी बरोबर म्हटले आहे , ‘जसे तुम्ही अन्न खाता, तसे तुमचे मन असावे’. ज्यांच्या सहवासात तुम्ही आहात, तुमची मानसिकता तुकडे-तुकडेवाली असणारच. अशा शब्दात मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनुपम आणि अक्षयनेही प्रतिक्रिया दिली

हे वाचलं का?

    follow whatsapp