Sai Pallavi : “काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही”

मुंबई तक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री साई पल्लवीने (Sai Pallavi) एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. साई पल्लवी तिच्या विराट पर्वम या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. काय म्हटलं आहे साई पल्लवीने? ”द […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री साई पल्लवीने (Sai Pallavi) एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. साई पल्लवी तिच्या विराट पर्वम या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

काय म्हटलं आहे साई पल्लवीने?

”द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” असं साई पल्लवीने म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

हे वाचलं का?