आर्यन खान प्रकरणी चौकशीचे अधिकार काढल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई तक

आर्यन खान प्रकरणात चौकशीचे अधिकार काढल्यानंतर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आल्यानंतर त्यांच्याशी आज तकने संपर्क साधला. ज्यानंतर त्यांनी आज तकला फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले आहेत समीर वानखेडे? मी मुंबई एनसीबीचा झोनल डायरेक्टर आहे, यापुढेही असणार आहे. माझ्याकडून हे पद काढून घेण्यात आलेलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आर्यन खान प्रकरणात चौकशीचे अधिकार काढल्यानंतर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आल्यानंतर त्यांच्याशी आज तकने संपर्क साधला. ज्यानंतर त्यांनी आज तकला फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आहेत समीर वानखेडे?

मी मुंबई एनसीबीचा झोनल डायरेक्टर आहे, यापुढेही असणार आहे. माझ्याकडून हे पद काढून घेण्यात आलेलं नाही. आर्यन खान प्रकरणी माझ्यावर नवाब मलिक यांनी आरोप केले होते. त्यामुळे नवाब मलिकांनी केलेल्या आऱोपांची आणि आर्यन खान प्रकऱणाची चौकशी SIT कडून चौकशी करावी असं मीदेखील सुचवलं होतं. त्यामुळे आता हे प्रकरण माझ्याकडून काढून घेतलं हे एक प्रकारे बरंच झालं. मी ड्रग्ज प्रकरणात ज्या काही खास मोहिमा असतील त्या राबवत राहणार. मला दिल्लीत बोलवण्यात आलेलं नाही. मात्र मला या केसमधून वेगळं करण्यासाठीची ऑर्डर समोर मला मिळाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp