सांगलीतील ‘त्या’ ९ जणांची ‘हत्या’; गुप्तधनाच्या अमिषाने घडलं ‘हत्याकांड’

मुंबई तक

स्वाती चिखलीकर सांगली: सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ येथे 20 जून रोजी झालेल्या दुर्दैवी नऊ जणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. गुप्तधनाच्या अमिषाने हे हत्याकांड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी 2 संशयितांना सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. या दोघांनीच काही तरी विषारी वस्तू खायला दिल्याने या हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी धीरज […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

स्वाती चिखलीकर

सांगली: सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ येथे 20 जून रोजी झालेल्या दुर्दैवी नऊ जणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. गुप्तधनाच्या अमिषाने हे हत्याकांड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी 2 संशयितांना सोलापुरातून अटक करण्यात आली आहे. या दोघांनीच काही तरी विषारी वस्तू खायला दिल्याने या हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी धीरज चंद्रकांत सुरवशे, अब्बास महंमदअली बागवान या दोघांना अटक करण्यात आली आहे. (Sangli Family Murder Case)

उद्या या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. या प्रकरणी यापूर्वीच 25 जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी 19 जणांना आजपर्यंत अटक करण्यात आली आहे. मयत डॉ . माणिक वनमोरे , आणि पोपट वनमोरे यांच्या गुप्तधनाच्या अनुषंगाने काही व्यक्तींसोबत रात्री भेटी गाठी होत होत्या. त्यांची तांत्रिक माहिती पोलिसांना मिळाली होती त्याआधारे तपास करून वरील दोन आरोपींना सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे. आणि पुढील तपास सुरू आहे.

नेमकी घटना काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp