नारायण राणेंनी यात्रेची येड्यांची जत्रा केली; संजय राऊतांचा राणेंवर पुन्हा प्रहार

मुंबई तक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जनआशीर्वाद यात्रेदरम्यान झालेल्या अटक व सुटकेनंतर राज्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एका राणेंवर प्रहार केला आहे. नारायण राणे यांनी केलेलं विधान, भाजपने दिलेला पाठिंबा या मुद्यावरुन राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे. इतकंच नाही, तर राणे यांच्या दोन्ही मुलांवरही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जनआशीर्वाद यात्रेदरम्यान झालेल्या अटक व सुटकेनंतर राज्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एका राणेंवर प्रहार केला आहे. नारायण राणे यांनी केलेलं विधान, भाजपने दिलेला पाठिंबा या मुद्यावरुन राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे. इतकंच नाही, तर राणे यांच्या दोन्ही मुलांवरही राऊत यांनी निशाणा साधला.

संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून राज्यात आठवडाभर रंगलेल्या राणे प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री ठाकरे यांना धमकी देणाऱ्या नारायण राणे यांच्यावर कायद्याने कारवाई केली. राणे यांच्यावरील कारवाई unconstitutional म्हणजे घटनाबाहय असल्याचे तारे भाजप नेते तोडतात तेव्हा आश्चर्य वाटते. राणे हा अपराध वारंवार करीत राहिले! त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हा कोणाला गुन्हा वाटत असेल तर ते भारतीय संविधानास कुचकामी ठरवत आहेत’, अशा शब्दात राऊतांनी राणे यांच्यावरील कारवाईवर टीका करणाऱ्यांना सुनावलं.

‘केंद्रातले एक मंत्री नारायण राणे महाराष्ट्रात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी आले. त्या यात्रेची त्यांनी येड्यांची जत्रा केली. मोदी सरकारातील अनेक मंत्री देशभरात अशा जन आशीर्वाद यात्रा करीत फिरत आहेत. महाराष्ट्रात भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील फिरत आहेत. त्या सर्व यात्रा सुरळीत पार पडत आहेत. फक्त राणे यांनी परंपरेनं गोंधळ घातला. त्यामुळे मोदींच्या यात्रेचं महत्त्वच नष्ट झाले’, असा टोला राऊतांनी लगावला.

हे वाचलं का?

    follow whatsapp