कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वर्ध्यात शाळा, महाविद्यालयं बंद

मुंबई तक

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे वर्ध्यात शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. वैद्यकीय शिक्षण संस्था सुरू असणार आहेत. पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कामकाज सुरू ठेवून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्याच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे वर्ध्यात शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. वैद्यकीय शिक्षण संस्था सुरू असणार आहेत. पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कामकाज सुरू ठेवून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वर्ध्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. यवतमाळ आणि अमरावती या ठिकाणी लॉकडाऊन तर इतर शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी काय आदेश दिले आहेत?

हे वाचलं का?

    follow whatsapp