मुख्यमंत्र्याच्या आवाहनानंतर शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं आवाहन केलं. तसंच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा लग्न सोहळा रद्द केल्याबद्दल त्यांचंही कौतुक केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ट्विट करून शरद पवार यांनी ही माहिती […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं आवाहन केलं. तसंच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा लग्न सोहळा रद्द केल्याबद्दल त्यांचंही कौतुक केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ट्विट करून शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे.
काय म्हणाले आहेत शरद पवार?
“कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत” असं ट्विट करत शरद पवार यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 22, 2021
नितीन राऊत यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?