कायद्याच्या चिंधड्या उडवल्या जाताहेत आणि सर्वोच्च न्यायालयही गप्प आहे – खासदार सावंत

मुंबई तक

शिवसेनेतील दोन्ही गटातील (शिंदे गटातील आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेले आमदार) आमदारांवर अपात्रतेबद्दल कोणतीही कारवाई करू नये, असं सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी (११ जुलै) स्पष्ट केलं. तसे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले असून, शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली असून, काही घटनांचं उदाहरण देत त्यांनी नाराजी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेतील दोन्ही गटातील (शिंदे गटातील आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेले आमदार) आमदारांवर अपात्रतेबद्दल कोणतीही कारवाई करू नये, असं सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी (११ जुलै) स्पष्ट केलं. तसे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले असून, शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली असून, काही घटनांचं उदाहरण देत त्यांनी नाराजी व्यक्त केलीये. Arvind Sawant यांनी याबाबत तिखट शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना कुणाला मतदान करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत भूमिका मांडताना अरविंद सावंत म्हणाले, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं की, खासदारांशी चर्चा करून निर्णय घेईन. आज दुपारी खासदारांची बैठक लावली आहे. त्यात काय निर्णय होतो, तुम्हाला कळेलच.”

shiv sena crisis : शिंदे सरकारला मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयात नेमकं घडलं?

शिवसेनेचे १४ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या दावा सावंत यांनी फेटाळून लावला. “नवी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात भाषण करताना म्हटलं होतं की, संपर्कात असलेल्यांची नावं द्या पाठवून देतो. माझं त्यांना आवाहन आहे की, हे १४ जण कोण आहेत, त्यांची नावं जाहीर करा. कळू द्या कोण आहेत ते. पक्षाच्या आत थोडी लोकशाही असतेच की, पक्षप्रमुखांकडे आमचं मत मांडायला आम्हाला अधिकार आहे. त्यांनी कधीही आम्हाला रोखलं नाही की, असं का बोलतोय म्हणून. मध्ये झालेली बैठकही दिलखुलासपणे झाली. १६ खासदार त्या बैठकीला होते,” असं अरविंद सावंत म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp