संजय राठोडांच्या मुळावरच उद्धव ठाकरे घालणार घाव, शिवसेनेचा मोठा प्लॅन फुटला
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा भाग असलेल्या संजय राठोडांविरोधात ठाकरेंची मोठी खेळी समोर आलीये. ज्यांच्या पाठिंब्यावर राठोडांचं राजकीय बस्तान बसलं, तिथेच दमदार एंट्री करण्याची तयारी ठाकरेंकडून केलीय जातेय. राठोडांना बालेकिल्ल्यातच चारीमुंड्या चीत करण्याच्या या मास्टर प्लॅनने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीये. हा डाव नेमका काय, त्यामुळे राठोडांची कोंडी कशी होऊ शकते, आणि सगळ्या खळबळीनंतर पोहरादेवीचे […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा भाग असलेल्या संजय राठोडांविरोधात ठाकरेंची मोठी खेळी समोर आलीये. ज्यांच्या पाठिंब्यावर राठोडांचं राजकीय बस्तान बसलं, तिथेच दमदार एंट्री करण्याची तयारी ठाकरेंकडून केलीय जातेय. राठोडांना बालेकिल्ल्यातच चारीमुंड्या चीत करण्याच्या या मास्टर प्लॅनने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीये.
हा डाव नेमका काय, त्यामुळे राठोडांची कोंडी कशी होऊ शकते, आणि सगळ्या खळबळीनंतर पोहरादेवीचे महंत काय म्हणतात, त्यामुळे सगळ्या प्रकरणात कसा ट्विस्ट निर्माण केलाय, तेच आपण समजून घेऊयात…
बंजारा समाजातील तरुणी पूजा राठोडच्या संशयास्पद मृत्यूने संजय राठोड संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले. या प्रकरणाने ठाकरे सरकारची मोठी नाचक्की झाली. शेवटी भाजप नेत्या चित्रा वाघांच्या वाढत्या दबावामुळे राठोडांना राजीनामा द्यावा लागला. नंतर शिवसेनेतल्या बंडात राठोडांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात उडी मारली. मंत्री झाले.
4 मुद्द्यात समजून घ्या, संजय राठोड कोण आहेत?