‘न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, कारण…’; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुंबई तक

शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष राजकीय वर्तुळात तसेच न्यायालयात सुरू आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात लढाई लढताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवरील सुनावणीवर आज उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ते शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, “आज ही एवढी गर्दी आहे. दसऱ्याला किती असेल, किती पटीने असेल. दसरा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष राजकीय वर्तुळात तसेच न्यायालयात सुरू आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात लढाई लढताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवरील सुनावणीवर आज उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ते शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज ही एवढी गर्दी आहे. दसऱ्याला किती असेल, किती पटीने असेल. दसरा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावर होणार आणि शिवतीर्थांवरच घेणार”, असा इशारा त्यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबद्दल ठाकरे काय म्हणाले?

“उद्या परवा सर्वोच्च न्यायालयातील निकाल अपेक्षित आहे. हा निकाल केवळ तुमच्या-माझ्या आयुष्याचा, शिवसेनेच्या भविष्याचा नाहीये. तर या देशात लोकशाही जिवंत राहणार आहे की, नाही हे ठरवणारा हा निकाल असणार आहे.”

Uddhav Thackeray: मुन्नाभाईला सोबत घेऊन भाजपला शिवसेना आणि ठाकरे घराणं संपवायचं आहे

हे वाचलं का?

    follow whatsapp