Padma: ‘बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे..’, BJPवर बोचरी टीका
Shiv sena (UBT) criticized to BJP on Padma Awards: मुंबई: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards) नुकतीच घोषणा झाली. पण आता याच पुरस्कारावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv sena UBT) पक्षाने भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो पण बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि वीर सावरकरांचा […]
ADVERTISEMENT

Shiv sena (UBT) criticized to BJP on Padma Awards: मुंबई: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards) नुकतीच घोषणा झाली. पण आता याच पुरस्कारावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv sena UBT) पक्षाने भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो पण बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि वीर सावरकरांचा मात्र मोदी सरकारला (Modi Govt) विसर पडतो. अशी टीका शिवसेनेने आपलं मुखपत्र असेलल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saamana Editorial) केली आहे. (shiv sena ubt once again criticized bjp on padma awards from saamana editorial balasaheb thackeray)
‘बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र विधानसभेत लावले त्याचा काय मोठा गाजावाजा केला! पण याच सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांची शिफारस भारतरत्नसाठी केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते. पण मुलायमसिंग यादवांचा गौरव करणारे मोदी शासन वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदयसम्राटांना मात्र विसरून गेले. लोकांनी या घटनेचे स्मरण ठेवायला हवे.’ अशी टीका करत शिवसेनेने भाजपवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडले आहेत.
पद्म पुरस्कार नाकारणारे बुद्धदेव भट्टाचार्य आणि संध्या मुखर्जी आहेत तरी कोण?
सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
-
प्रजासत्ताक दिनी देशातील अनेक प्रतिष्ठित मंडळींना ‘पद्म’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यातील बरीच नावे ही ‘संघ’ परिवाराशी संबंधित आहेत व त्याविषयी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पंतप्रधान मोदी यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणतात, ‘पद्म पुरस्काराने गौरविण्यात आलेल्यांचे देशासाठी योगदान आणि प्रयत्न यामुळे भारत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.’ आता पंतप्रधान मोदी म्हणतात म्हणजे ते खरेच असणार. झाकीर हुसेन, सुमन कल्याणपूर, भैरप्पा, सुधा मूर्ती, कुमारमंगलम् बिर्ला अशांचा गौरव झाला तो योग्यच आहे.