ST Strike : तुम्ही आमचेच आहात; मुख्यमंत्री ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन

मुंबई तक

“तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन केलं. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासह आपल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

“तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन केलं.

एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासह आपल्या विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं राज्यात प्रवाशांचे हाल होत असून, उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सरकारने विलिनीकरणासाठी समितीही स्थापन केली आहे. तर दुसरीकडे संप सुरूच आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊलं उचलत आहोत ते सांगितले असून, न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp