यासाठीच मोदी-शाहांनी ईडीचा वापर करून कळसुत्री बाहुल्यांचं सरकार आणलं -नाना पटोले
शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रद्रोही संबोधत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टाटा एअरबस प्रोजेक्टवरून टीका केलीये. केंद्रातलं मोदी सरकार मुंबई, महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत असून, राज्यातलं सरकार एक दिवस मुंबईही गुजरातला देऊन टाकेल, अशा शब्दात पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. ते नागपूर येथे बोलत होते. टाटा एअरबस प्रोजेक्टवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर […]
ADVERTISEMENT

शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रद्रोही संबोधत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टाटा एअरबस प्रोजेक्टवरून टीका केलीये. केंद्रातलं मोदी सरकार मुंबई, महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत असून, राज्यातलं सरकार एक दिवस मुंबईही गुजरातला देऊन टाकेल, अशा शब्दात पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. ते नागपूर येथे बोलत होते.
टाटा एअरबस प्रोजेक्टवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं. “महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्त्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचं. या ध्येयानं केंद्रातलं मोदी सरकार गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहे.”
“राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबईही गुजरातला देऊन टाकेल. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे”, असं नाना पटोले यांनी म्हटलंय. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
“महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे, याचं शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे”, असं नाना पटोले म्हणाले.