विनायक मेटेंचं जाणं मराठवाड्यावरील पहिला आघात नाही; ‘या’ चार नेत्यांची एक्झिट होती धक्कादायक
मराठवाडा तसा राज्यात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, राज्याला तसेच देशाला या मराठवाड्याने अनेक लढवय्ये नेते दिले. मात्र, मराठवाड्यातील या नेत्यांना नियतीने लवकरच येथील जनतेपासून हिरावून घेतलं. त्यामुळे या नेत्यांचं जाणं हे मराठवाड्यावर मोठं आघात मानलं जात आहे. अगदी प्रमोद महाजनांपासून विनायक मेटेंपर्यंत नेते अकाली जात आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण होत […]
ADVERTISEMENT

मराठवाडा तसा राज्यात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, राज्याला तसेच देशाला या मराठवाड्याने अनेक लढवय्ये नेते दिले. मात्र, मराठवाड्यातील या नेत्यांना नियतीने लवकरच येथील जनतेपासून हिरावून घेतलं. त्यामुळे या नेत्यांचं जाणं हे मराठवाड्यावर मोठं आघात मानलं जात आहे. अगदी प्रमोद महाजनांपासून विनायक मेटेंपर्यंत नेते अकाली जात आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण होत आहे.
प्रमोद महाजन –
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून येणारे प्रमोद महाजन. यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवला होता. महाराष्ट्रात घराघरात भाजप पोहचवण्याचं काम त्यांनी आपले मित्र गोपीनाथ मुंडेंसोबत केलं. कालांतराने देशाच्या राजकारणात त्यांचा दबदबा निर्माण झाला. मराठवाड्यातील छोट्याशा गावातून आलेले प्रमोद महाजन यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री देखील राहिले होते. भाजपचे पुढचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून देखील त्यांच्याकडे पहिले जायचे. मात्र, अचानक 3 मे 2006 रोजी त्यांच्या राहत्या घरी त्यांच्याच भावाने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. राष्ट्रीय राजकारणात आपली ओळख निर्माण करणाऱ्या या नेत्याने वयाच्या 57 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भाजपसह मराठवाड्याला देखील मोठा धक्का पोहचला होता.
विलासराव देशमुख –