उद्धवजी फक्त जनतेला सांगा, मुख्यमंत्री असूनही माझ्या पत्नीचे बंगले चोरीला गेले-किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचे 19 बंगले असल्याचा आरोप केला आहे. कोर्लई गावात हे बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. अशात आज किरीट सोमय्या हे कोर्लई गावाला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना राडाही करू शकतं. मात्र आज किरीट सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत […]
ADVERTISEMENT

भाजप नेते किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचे 19 बंगले असल्याचा आरोप केला आहे. कोर्लई गावात हे बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. अशात आज किरीट सोमय्या हे कोर्लई गावाला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना राडाही करू शकतं. मात्र आज किरीट सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उद्धवजी जनतेला सांगा, मुख्यमंत्री असूनही माझ्या पत्नीचे बंगले चोरीला गेले असं म्हटलं आहे.
कोर्लई गावातले 19 बंगले रश्मी ठाकरेंच्या नावावर आहेत का? सरपंच उत्तर देत म्हणाले…
आणखी काय म्हणाले आहेत सोमय्या?
गेल्या 17 महिन्यांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत आहोत. मला त्या ग्रामपंचायतीनंच माहिती दिली आहे. त्यांनी जी कागदं दिली आहेत त्यावरुनच आम्ही बोलत आहोत. आम्हाला वास्तविकता काय झालं हे समजून घ्यायचं आहे. काय झालंय हे आम्हाला मुख्यमंत्र्यांनीच सांगावं. ते खोटं बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्री साहेब चुका होतात. फक्त जनतेला सांगा की मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.