शिवसेनेचे आमदार हॉटेल ‘बंद’, दोघांच्या मतांवर प्रश्नचिन्ह; विधान परिषदेसाठी कुणाचं पारडं जड?
विधान परिषद निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार असून, राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या धड्यानंतर महाविकास आघाडी सावध पावलं टाकत आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आल्यानं विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला आहे. तरीही काँग्रेस आणि भाजपसमोर जास्तीचा एक उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान कायम आहे. […]
ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार असून, राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या धड्यानंतर महाविकास आघाडी सावध पावलं टाकत आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आल्यानं विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला आहे. तरीही काँग्रेस आणि भाजपसमोर जास्तीचा एक उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान कायम आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी गुप्त मतदान असल्यानं राजकीय पक्षांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. स्वतः पक्षातील आमदारांबरोबरच समर्थन देणाऱ्या आमदारांची मतं आपल्यालाच मिळतील यासाठी प्रयत्न केले जात आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून मतं फुटू नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जात आहे. शिवसेनेनं आपले आमदार पवईतील हॉटेल रेनसाँमध्ये ठेवले आहेत. हे आमदार २० जून पर्यंत हॉटेलमध्ये राहणार असून, मतदानासाठीच बाहेर पडणार आहेत.
विधान परिषद निवडणूक : आघाडीतच कुरघोड्या! शिवसेना समर्थक आमदारांना राष्ट्रवादी-काँग्रेसकडून फोन