भाजपविरोधातली एकजुटीने लढली पाहिजे, काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय-नाना पटोले

मुंबई तक

भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मुंबई दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपविरोधात ठामपणे उभे राहिले असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

Sharad Pawar हेच महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल-नाना पटोले

भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुलजी मोदी सरकारविरोधात लढले. भाजपची विभाजनवादी निती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. तसेच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीदेखील भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बैठक चालली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पण यावेळी जनतेला तिसरा पर्याय देणार का असा सवाल पत्रकारांनी विचारल्यानंतर तसा विचार नाही, जे येतील त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा विचार आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp