राज्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा, तर उद्यापासून कठोर निर्बंध होणार लागू
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ मंत्री परिषद बोलावण्यात आली होती. या मंत्री परिषदेनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माहिती देतान स्पष्ट केलं की, तूर्तास राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन नसेल. पण उद्या (5 एप्रिल) रात्री 8 वाजेपासून कठोर निर्बंध असणार आहेत. तसंच शनिवारी आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. शुक्रवारी रात्री […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ मंत्री परिषद बोलावण्यात आली होती. या मंत्री परिषदेनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माहिती देतान स्पष्ट केलं की, तूर्तास राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन नसेल. पण उद्या (5 एप्रिल) रात्री 8 वाजेपासून कठोर निर्बंध असणार आहेत. तसंच शनिवारी आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.
शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन असेल अशी माहिती कॅबिनेट मंत्री नबाब मलिक यांनी दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री 8 वाजेनंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी असणार आहे. (weekend lockdown in the state strict restrictions will be in place from tomorrow)
त्यामुळे राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन नसला तरी अंशत: लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन लागू केलं जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पाहा नेमकं काय म्हणाले नवाब मलिक.
CM ठाकरेंचा फडणवीस आणि राज ठाकरेंना फोन, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री